ब्लॉग संग्रहण

सोमवार, ३० मे, २०११

रविवार म्हणजे.........


रविवार म्हणजे..........
आदल्या रात्री सुखाने झोपी जाण्याचा
सहा दिवसाची झोप भरून काढण्याचा
आळसावुनच सुरु होणा-या दिवसाचा
शांतपणे कडक चहाचा आस्वाद घेण्याचा
वर्तमानपत्रातील प्रत्येक बातमी वाचण्याचा
आठवडाभर थकलेली कामे आवारन्याचा.....
रविवार म्हणजे..........
मुलांसोबत धम्माल अन मज्जा करण्याचा
मित्र मैत्रिंणींसोबत भरभरून गप्पा मारण्याचा
सकाळचा खास नाश्ता आरामशीर करण्याचा
मुलांची सुट्टी , गोंधळ , नाही ते हट्ट करण्याचा
दुपारच्या जेवणात काही वेगळेपणा आणण्याचा
अचानक घरी आलेल्या पाहूण्यांच्या सरबराईचा..........
रविवार म्हणजे..........
मंद आवाजात गाणे लावुन पुस्तक वाचण्याचा
मुलांबरोबर संध्याकाळी बागेत जाण्याचा
हिरवळीवर हुंदडत बालपण आठवण्याचा
भेळपुरी किंवा पाणीपुरीवर ताव मारण्याचा
बदल म्हणुन रात्रीच जेवण बाहेर घेण्याचा
थकून आल्यावर उद्याची तयारी करण्याचा..........
रविवार म्हणजे..........
आराम म्हणताना जास्तच थकण्याचा
स्वःताला वेळ देईन असे ठरवण्याचा
पण तो कधी कधीही न मिळण्याचा
रविवार आला म्हणता म्हणता संपण्याचा
बदला पेक्षा रोजचे रुटीन चांगले म्हणयाचा
वर म्हणायचे रविवार म्हणजे बदलाचा ...............
                                         

                                                          बिका




पाठवणी .....




आज सोडून जात आहे आई -बाबांना 
दुख खूप होत आहे मनाला 
जीवनात देवानंतर मानल त्यांना 
आज सोडून जात आहे माझ्या देवाला 


माझ्या जीवनाचे शिल्पकार ते 
त्यांनी घडवल मला 
माझ्या जीवनाचे कलाकार ते 
शिकवली जीवनाची कला 

जीवन जगताना अनेक संकटे आली 
पण त्यांच्या पंखाखाली
कधीच नाही जाणीव झाली 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 
त्यांनी दिला आधाराचा हात 
आज त्यांचा आधार बनायचं सोडून 
सोडून जात आहे त्यांचा हात 

पुढचे नाते कसे असतील माहित नाही 
पण आई -बाबांची माया कधीच
 कमी  होणार नाही............................


बिका (८ मे १९९९ )

( ह्या कविते मध्ये व्याकरनाच्या दृष्टीने खूप चुका आहेत ..यमक जुळले नाही पण हे शब्द .. मी माझे माहेर सोडताना लिहिले आहेत अन ते जसेच्या तसे येथे टाकत आहे कोणताही बदल न करता .......)


हदयाची बोलकी सपंदन .....


मी कधी एकटी नसतेच मुळी
आठवणी देतात सोबत
काही सुखद तर काही दुखद
मग तयार होतात
हदयाची बोलकी सपंदन .......................

या आठवणी म्हणजे तरी काय आसत ?
घडून गेलेल
स्वप्न ? कि असतीत्वात येउन गेलेली कल्पना ?
कि आणखी काही ? काहीही आसो .............
कधी कधी आठवणीच जगण्याची उत्कटता , उमेद , आसक्ति वाढवतात, 
भयाण एकांतात  आश्वासक जवळीक साधतात 
 विरहाच्या लाटाना परतुन लावण्याच विलषण सामर्थ्य हे आठवणीत असत .
जगण्यातला अगाध आनदं धुंडाळन्याच धारिष्ट आठवनीना होत ...
कधी कधी हया आठवनी गर्दी करालाय लागतात अगदी
कधी भंडावुन टाकतात .
मनाचा तनाचा अगदी कोपरा न  कोपरा त्या व्यापून टाकतात.
आपल्या आस्तित्वने एक ना अनेक आठवणी
पोर्णिमेच्या रात्रि आकाशात ता-यानि गर्दी करावी तशी
काही आठवानिना तर अतीव हलुवारतेची, तरलेतेची नाजुक्तेची आगळी किनार लागलेली असतेच.......
अश्या आठवणी एकमेकांवर वर्चस्व गाजवू पहातात.
काही आठवणी कलानुरुपे पुसट होत जातात आणि काही सदेव अबाधित राहतात .
त्या सुखद आठवणीने स्मित ह्यासाची पखरण चेहर्यावर होत जाते आणि
कधी कधी एकांतातल्या सुखद आठवानिचे ढलायला लागतात आश्रू म्हणुनच काही आठवानिना सावरयाच नसत . मनसोक्त रडू द्याच असत .
त्यांचीच तर जपनुक दिसते. काही आठवणी आसतात शुक्राच्या ताराप्रमाने.....
तर काही प्राणपनाने जिवापाड जपना-या ठेवनितल्या वस्त्रसारखी आणि
एकांततल्या वेळी जवलिक साधयाची असते त्या आठवनिशी तसे पाहता.
माणूस  कधी एकटा नसतोच मुळी ,
त्याच्या सोबतित आसतात असंख्य आठवनी आणि
आसतात ती आठवणीत तयार झालेली हदयाची बोलकी सपंदन .........................

बिका ....



रविवार, २९ मे, २०११

सोनफुल ........




ऐका कहानी सांगते स्वयंसिद्धा ची 
विशेष मुलासाठी धडपडनारा आईची 
एक   होत  गाव ,औरंगाबाद त्याच नाव
प्रतेक स्वामिनी , मानिनी च्या गुणाना भरपूर वाव
 माप ओलांडून सुरु केल नव जीवन
 राजा राणीच्या  संसारात झाली  रममाण
सुखी संसारात पडला मिठाचा खड़ा 
नशिबाने दिला नविन धडा
जीवनात सुरु जाले नविन पर्व 
डॉक्टर थेरपी, देव आणि दैव 
ओघानेच आल सावरण समजावण
एकमेकीना आधार देत पुढे जाण 
केला निश्च्चय  आगदी पक्का 
सोनफुलाला दयाचा हक्क त्याचा 
आज पासून प्रत्येक शाव्स
जगायचा त्याचाच साठी खास
मार्ग होता खुप खडतर
इच्छा शक्ति जबरदस्त 
भव्य कल्पनेला मिळाली साथ
स्वप्न झाले सुन्दर सत्य एकमेकींच्या सोबतीने
आलो इथवर पार करुन जाऊ नक्कीच भव्य पैलतीर...........
                                         बिका

गंगा ..........



   शांत झुळ झुळ वाहणारी गंगा 

    हलवुन गेली मनाचा कोपरा न कोपरा 
    त्या नदी काठी होते छोटे छोटे डोंगर 
    अन त्याहुन विशाल माझ्या कल्पनांचा भ्रमर !!!
                                          


                                   बिका ............

सुरुंग ........




सुरुंग लागते कधी कधी 
अन मनाचा बांध फुटतो 
अश्रूंच्या धारा बरसू लागतात 
मन ओलेचिंब करतात 
वळीवाच्या पावसासारख्या 
वादळ बनुन येतात 
नको त्या आठवणी 
काही खपल्या असतात 
वाळलेल्या वरवरून 
आत मात्र भळभळत असते जखम 
मग आपणच आपली 
समजुत काढ्याची 
अश्रुना कितीही थोपवल 
तरी ते ऐकत मात्र नाहीत 
मग बेदर्द पणे मीही 
कोसळते त्या भयाण दरीत 
दुखाचे मुखवटे बदलतात 
यातना त्याच असतात 
कष्टाचे रूप पलटते
दंभ मात्र तोच 
प्रयत्नांती खोटीच 
उमीद बुद्धी जागवते 
मनही सावरत 
आणि सज्ज होत 
मृगजळा मागे धावण्या 
पुर्ण रजनी संपते 
दोलनामय अवस्थेत 
नवी प्रभा घेऊन येते 
नवी आशा , अपेक्षा 
पुन्हा उभ राहत 
घेऊनी गरुडाचे पंख 
पुन्हा चढवून 
कणखरपणाचे
कवच कुंडल ..............





पण रात्रीची घालमेल ,,, ओलीचिंब उशी 
सांगुन जाते ...............
                                      बिका

वचन.......


आज वचन काय देवु तुला ?????
१२ वर्षापुर्वी वचन दिले
अखंड साथ देण्याचे
आणि प्रतेक पावलावर
तु ती दिलीस ............
आणि मी ही ते निभावल
निमिष अंधारातून
तेजोमय प्रकाशाकडे
घेवुन गेलास ...........

कदाचित पुढची वाट
ह्यावुन बिकट असेल
पण तुझ्यात मी अन
माझ्यात तु असशील
अगदी नेहमी साठी !!

स्वमग्न मी.........!!!!!

 २ एप्रिल जागितक स्वमग्न दिन . त्यानिमित्याने माझ्या सर्व छोट्या दोस्ताना शुभेच्छा !!

स्वमग्न जरी मी असे
परी मतीमंद मी नसे

जरी एक तुमच्यातील
परी विश्व माझे वेगळे

जगतो रोज आयुष्य तेच
बदल कोणता मान्य नसे

गतीची मज आवड भारी
वायुसमे धावे मती माझी

स्पर्शाची मज आवड नाही
आवाजाची भीती वाटत राही

कल्पना विश्वात रमतो
वास्तवाशी देणे न घेणे

अंकाशी माझी मैत्री खास
सुर अन रंगात मन हरवे

मी तर मृग नाभीचा
सुगंध दुर दिगंत पसरे

श्रीहरी टाकळकर,मयुर कुलकर्णी

शब्दांकन ( बिका )

आयुष्याची नवी सकाळ.......

शिखरावर असता मज, 
दरीचा पड़े विसर 
दरीत पड़ता खोल, 
साद घाली शिखर, 
शिखरावरून दिसे मज, 
तो हरवलेला भूतकाळ ,
दरीतून दिसे मला ती, 
आयुष्याची नवी सकाळ.......



                     बिका